Saturday, February 20, 2016

सगळं काही..

उगाच उथळ सगळं काही.. 
बेभरव्श्याचं निरर्थक सगळं काही..
परवाचा वाढदिवस आणि कालचा पगार 
हातात स्वप्न आणि एक आळशी दुपार..
त्याचा एक फोन माझे चार इमेल्स 
प्रेमाचा एक त्रिकोण आणि बाकी सगळं गोल
कामाचा व्याप आणि व्यापात मी ...
माझात तू आणि तुझात?
पुन्हा तेच..उगाच उथळ सगळं काही..
बेभरव्श्याचं निरर्थक सगळं काही..
-अक्षता

Saturday, December 12, 2015

गच्ची

                                                                                                                  

तिची आणि  माझी ओळख तशी दीड वर्षभरापूर्वीची....एका कॉमन मित्रामुळे आमची ओळख झाली.तिला पाहताच क्षणी ती माझी होऊन गेली.हि 'ती' दुसरी तिसरी कुणी नसून ती आहे माझ्या मित्राचा घराची 'गच्ची'.खरंतर लहानपणापासून मी वन रूम किचन एवढ्याशा घरात राहिले, वाढले असल्यामुळे मला कायम गच्ची किंवा बाल्कनी या प्रकाराचं विशेष आकर्षण होतं.मला कायम वाटायचं दोन खोल्यांचं घर असलं तरी चालेल पण घराला मोठी मोकळी गच्ची असावी.त्या गच्चीवर खूप सारी झाडं असावीत, झाडांना रोज रंगीबेरंगी फुलं यावीत.वर पाहावं तर चंद्र आपल्या गच्चीतच पाहतोय असं वाटावं.रात्री गच्चीत आरामखुर्ची टाकून मस्त जुनी हिंदी गाणी ऐकावीत.जणू काही आकाशातून रफी ,किशोर यांनी माझ्या गच्चीतच अवतराव.तिथेच बसून झाडांशी गप्पा माराव्या.आणि भांडणं झाली तर झाडांशी कट्टी घेऊन वरचा निळाशार आभाळाशी बोलावं......पण इतका सगळं करायला मुंबईत तशी गच्ची मला काही सापडली नाही जिला पाहताच क्षणी आपलं व्हावं.पण साधारण दीड वर्षापूर्वी पुण्यात एका मित्राचा घरी  जाणं झालं आणि ती भेटली.त्याने घराचं दार उघडून आत यायला सांगितलं,मी दार लोटून घेतलं आणि उजवीकडे पाहिलं  तर छान झाडा-फुलांनी भरलेली गच्ची दिसली.आपसूकच पाय पहिले गच्चीकडे गेले.कधी कधी असं होतं कि एखाद्याला आपण आपल्या पहिल्या भेटीतच ओळखतो,कळून जातं कि याचं आणि माझं जमेल.तसं काहीसं तेव्हा मला त्या गच्चीबद्दल वाटलं.पहिल्या भेटीतच ती माझी होऊन गेली.काही ठिकाणं,काही माणसे अशी असतात कि आपल्याला तिथे त्या जागेसाठी,त्या माणसांसाठी थांबायच असतं.मला त्या गच्चीवर गेल्यावर तिथेच थांबून राहावं कायम असं वाटत होतं.तसं मी लगेच माझ्या मित्राला म्हणाले देखील कि फक्त गच्ची विक मला (पूर्ण घर विकत घेणं सध्यातरी परवडणार नाही..हाहाहा )..पण त्याने ते फार मजेत घेतलं.पण खरंच काही जागांवर निर्जीव असून देखील जीव लावासा वाटतो.गच्चीवर गादी टाकून वर आकाशाकडे पाहत झोपण्यात कित्ती मज्जा येईल ना.पण खरी धमाल तर पावसात येते तिथे.असं वाटत कि पावसाच्या सरी आपल्यावर बरसण्यासाठीच आपल्या गच्चीत ढगांना घेऊन आल्या आहेत. आपल्याला अनेक मित्र मैत्रिणी असले तरी प्रत्येक मित्रा बरोबरचं, मैत्रिणी  बरोबरचं नातं हे फार वेगळं असतं.त्या मित्राची किंवा मैत्रिणीची जागा इतर कुणी घेऊ शकत नाही.तसंच मला जागांच वाटतं.त्या गच्चीची  रिप्लेसमेंट इतर कोणतीही जागा घेऊ शकत  नाही.या गच्चीचं आणि माझं एक वेगळंच नातं आहे.तिथे मिळणारी शांतता, तिथे मला सापडणार माझं अस्तित्व हे इतर कुठेही मिळणार नाही.जणू काही ती गच्ची मला माझंच आतलं रूप दाखवत असते.असं वाटतं कि वाऱ्याबरोबर झुलत राहावं, आकाशाचा निळ्याशार रंगात  स्वतःला शोधावं,जे काही आहे मनात ते सगळं काही गच्चीला सांगून मोकळं व्हावं.आणि गच्चीनेही शान्तपणे सगळ ऐकून आपल्यालाला कवेत घ्यावं.तिथून निघताना कायम वाटतं कि माझं असं काहीतरी मी इथे सोडून जातेय आणि त्यामुळेच पुन्हा येण्याची ओढ सतत मनात असते.मागे H . Masud Taj  यांच एक आर्टिकल वाचलेलं त्यात त्यांनी म्हटलेलं कि When you lean out of balcony, you wish to go beyond. When lean out, the balcony is dreaming you. Because where balconies end, a soaring begins that no parapet can curtail…Some balconies are like words left hanging in the air :)

Sunday, August 23, 2015

कुछ अनकहासा

बात लब्झोतक आयी थी..बतानाही था पर पता नही क्यू लब्झोनेही मुह मोड लिया.
कुछ तो था उन लब्झोमे जो रोक रहा था मुझे..
एहसास था वो अलगही उन लब्झोका जो अबतक कभी मेहसूसही नही किया..
गेहारायी थी उनमे जो कभी देखीही नही थी ..
पता नही क्यू पर कई  जगह  लब्झोने रोका..
पुछे कई सवाल जो अबतक मेने ना खुदको पुछे.
पर सवालोके जवाबोमे कई लब्झ मिले..एक दुसरेसे..
कुछ तो बता रहे थे मुझे  जैसे  कि सालोबाद मिले...
जैसे कि में सिर्फ कासीद थी उन लब्झोकी
जैसे कि में देख रही थी उन्हे..मेहसूस कर रही थी..सुन रही थी..
सोचा कि बाहोमे लेलू उन्हे ,थाम लु उनका हाथ और चल पढू उनके साथ
पर जाना था उन्हे एक अलगही रास्तेपे ..
वो चले गये मुझे एक नया एहसास देके और फिर जन्म हुवा अनकहे लब्झोका..

Sunday, May 17, 2015

मी आणि वारा कि मी आणि वेळ?

डोळे गच्च बंद करून फक्त या वाऱ्याचा आवाज ऐकावासा वाटतोय ,वाऱ्याचा स्पर्श पूर्ण देहाला नवीन स्वरूप देतोय.असं वाटतंय कि बास, आता काहीच नको आयुष्याकडून ...फक्त मी आणि हा वारा..आणि हा वारा जिथे जाईल तिथे त्याचाबरोबर वाहत सुटावं.कुठे थांबूच नये. कुठल्याही कारणासाठी नाही आणि कुठल्याही वेळेसाठी नाही..कारण जर थांबले तर थांबलेल्या त्या वेळेला मला किंमत द्यावी लागेल. आणि ती वेळ कशी असेल ते माहित नाही.आज चांगली तर उद्या वाईट. वेळेचा काही भरोसा नाही .वाऱ्याच तसं नाही.तो सतत फिरतच असतो.  दिशा कोणतीही असली तरी वाहता येतं.रोखणार कुणीही नसतं.खरं पाहता वाऱ्यासारखा जगणं सोप्पं आहे.दिशाहीन फिरण्यात देखील गम्मत असलेच कि नाही.मुळात दिशाहीन असं काही नसतंच माझा मते.आपल्यासाठी चुकलेल्या दिशेला आपण दिशाहीन म्हणून मोकळे होतो. किती conveniently आपण ठरवतो कि कशाला किती महत्व द्यायचं आणि कशाची काय व्याख्या करायची ते.आपल्या विचारांची पण गम्मत असते .कधी कधी आपण आज उद्याचा इतका विचार करतो कि 'आत्ताचा' विचार राहूनच जातो कि. माझंही काहीसं तसंच होतंय.आत्ता वारा म्हणतोय कि  चल बघू माझाबरोबर.छान हवं तितकं फिर. निवांत! कशाचीही फिकीर करता , कुठल्याही बंधनांचा विचार करता,'उद्या हे करायचं आणि परवा ते' या सगळ्या विचारांना मागे सोडून....चल!पण वेळ थांबवतेय.तिचं म्हणणं आहे कि वारा हा असाच फिरत राहणार,कुणास ठाऊक उद्या हा वारा तुझाबरोबर असेलच का? तो जाईलच कि त्याचा दिशेने.आणि हे असं तू किती वेळ फिरणार?कधीतरी कुठेतरी थांबावं लागेलच ना?मग तेव्हाचा वेळेला काय उत्तर देणार? त्यापेक्षा आत्ता थांब , मी बदलेन.आज वाईट वेळ जरी चालू असली तरी उद्या मात्र नक्कीच चांगली वेळ येईल. थांब इथे आणि धैर्याने वाईट वेळेला सामोरं जा, वाऱ्याबरोबर अशी पळू नकोस.
पण वाऱ्याचा हा मुक्तपणा, हा स्पर्श मोहात पाडतोय मला सगळं काही विसरून वाहायला.पण वेळ ,तिचं काय? वारा फक्त आत्ताचा क्षण देतोय मला असं मोकाट जगायला,उद्या तोही वेळेसमोर झुकला तर?उद्या कदाचित वेळ असेलही माझाकडे पण वारा नसला तर? ..मला दोन्ही हवंय..वाऱ्याबरोबर वाहणं पण आणि स्वतःला रोखू शकेल अशी वेळ पण.हा ना माझ्यासारख्या कन्या राशी वाल्या लोकांचा गोंधळच असतो नेहमी.दोन गोष्टींमधली एक गोष्ट काही निवडता येत नाही.पण मी वाऱ्याला सांगितलंय जरी मी आत्ता  तुझाबरोबर वाहू शकले नाही तरी हा वाहण्याचा गुणधर्म नक्की मला देऊन जा,निदान 'मी देखील कधीही वाहू शकते' हे 'वाईट वेळेला' सांगून blackmail तरी करता येईल .

Friday, October 10, 2014

मला भेटलेली ती

ऑफिसची कामे , वर्क प्रेशर , मिटींग्स याचा अत्यंत कंटाळा आलेला .दिवसरात्र डोक्यात ऑफिस आणि फ्युचर हेच चालू असतं. स्वतःची  Ca ची practice सुरु करायचीय तीही पुढचा दोन वर्षात...कसा काय जमून येणारय हेच सतत डोक्यात चालू असतं .त्यातून आईबाबांनी आणि निखिल चा आईबाबांनी २०१६ साल निश्चित केलय आमचा लग्नासाठी .तशी निखिल ला घाई नाही लग्नाची पण आता २०१४ चालूय आणि पुढल्या दोन वर्षात लग्नाआधी मला माझं ऑफिस सुरु करायचंय.सगळा गोंधळच आहे नुसता मनात.या सगळ्यातून जरा ब्रेक मिळावा म्हणून निखिलनेच सुचवला कि गावी जावून ये कोकणात ४ दिवसासाठी  ..बरं वाटेल छान पावसाळी वातावरण आहे तर फ्रेश होशील....कोकण दर्शनाची सुरवात खास प्रवासापासूनच सुरु करावी म्हणून रात्रीचा प्रवास ऐवजी दिवसाचा प्रवास निवडला. आणि सकाळचा ट्रेनची तात्काळ मध्ये तिकीट काढून मोकळी झाले.
सकाळी सकाळी स्टेशनवर मस्त वाफाळता चहा घेऊन दादर- सावंतवाडी अशा प्रवासाला सुरवात केली.नशिबाने माझी विंडो सीट होती. विंडो सीट आणि जरा बरे सहप्रवाशी इतकी काय ती माझी माफक अपेक्षा असते कोणत्याही प्रवासाकडून.मग काय....मला नाही बुवा जमत प्रवासात पुस्तक वाचायला नाहीतर ढिम्मपणे बसायला.प्रवासात कसा चार नवीन प्रवासी भेटतात त्यांचाशी बोलावं, चार गोष्टी जाणून घ्याव्या.गप्पिष्ट असा माझा स्वभाव प्रवासात देखील शांत होत नाही.माझा समोरची विंडो सीट खरतर रिकामी होती पण बाकीचा चारही जागांवर सत्तरीतले आजी आजोबा बसलेले होते..खरतर माझा आजी आजोबा ग्रुप बरोबर पण जमत पण हे चौघे मात्र 'चायमे पानी जादा आणि शक्कर कम है फिरभी कैसा १० रुपया चाय का ' अशा चहावाल्याकडे सकाळी सकाळी कटकट करणाऱ्या कॅटेगरीतले होते.मनातल्या मनात म्हटला हा प्रवास अगदीच किरकिऱ्या लोकांबरोबर होणार असा दिसतंय एकूणच.पण तरी निदान समोरचा सीट वर जरा देखणा  मुलगा आला तर बरं होईल...म्हणजे निखिल तसा देखणाच आहे आणि लग्न पण फिक्स आहे आमचं पण तितकंच जरा नेत्रसुख प्रवासभर ;) पुढचं स्टेशन म्हणता म्हणता आलं पण आणि माझी  नजर  इकडे तिकडे पाहत होती कि नक्की कोण समोर येवून बसतंय..तितक्यात एक मुलगी सीट शोधत आली आणि समोरचा सीटवर येवून बसली .ट्रेकला नेतात तशी sack होती पाठीला .ती पाहूनच मनात म्हटलं नक्कीच गोव्याला फिरायला चालली असणार ही.साधारण माझाच वयाची दिसत होती चोव्वीस पंचविशीची...लूज टी शर्ट आणि खाली पायजमा ,गळ्यात कलरफुल स्ट्रोल, हातात मोठ्ठ घड्याळ आणि पायात शूज ...थोडी विचित्र वाटावी अशी fashion होती खरी पण एकूण personality  मात्र स्मार्ट होती. sack सीट खाली टाकून ती माझा समोर बसली...तितक्यात एक चहावाला आला.त्याचाकडून गरम गरम चहा घेऊन खिडकीबाहेर टक लावून पाहत  बसली.असं वाटत होता काहीतरी स्वप्न पाहतेय उघड्या डोळ्यांनी...डोळ्यात कमालीचा आत्मविश्वास दिसत होता..हुशार आणि कमालीची उत्साही अशी वाटत होती ती एकूणच मला.मी तिचाकडे पाहतेय हे तिचा लक्षात आल्यावर मी लगेच दुसरीकडे पाहायला लागले तर स्वताहून तिने shake hand करायला हात पुढे केला आणि म्हणाली '' Hi ! I am Anushka  Iyyer " मीही लगेच हात पुढे करून म्हंटलं "Hi ! I am अश्विनी रेडकर "ती लगेचच म्हणाली "रेडकर? वॉव, मराठी ,मस्तच !" मस्त'च' शब्द ऐकून आश्चर्याने विचारला तिला "मराठी येतं?""हो , अर्थातच, मुंबईत राहायचा म्हणजे मराठी आलंच पाहिजे ना आणि मी theater चा खूप अभ्यास केलाय सो अनेक मराठी नाटकं पाहिलीयेत ,वाचलीयेत त्यामुळे जमतं बर्यापैकी मराठी बोलायला "खूप उत्साहाने ती म्हणाली.मी मनात म्हटलं बरंय नाहीतर प्रवासभर 'ohh yeah , why  not ' असे इंग्रजी शब्द वापरावे लागले असते.ऑफिस मध्ये पण तेच असतं सतत तोंडात साखरे एवढं गोड इंग्लिश....मी लगेच विषय वाढवण्यासाठी म्हटलं "कमालच आहे तुझी,मराठी नाटकांचा अभ्यास वैगेरे तेही south Indian असताना देखील ?""Tamilian , I am Tamilian "मला लगेच वाटला तेच ना म्हणजे ..पण मग म्हटलं जाऊ दे.असतो एकेकाला मातृभाषेचा अभिमान...खरतर मीच आधी विचारायला हवं  होतं कि Iyyer म्हणजे नेमके कोण..पण माझं अज्ञान काय वाचणार तिचासमोर..मग तिनेच विचारला कि तू काय करतेस? मी सांगितल अमुक अमुक कंपनी मध्ये Ca आहे. Ca म्हटल्यावर तिचा थोडा चेहरा पडला ..मला कळेचना काय झालं म्हणून मी तिला विचारल "anything  wrong ?" तर ती म्हणाली " नाही , actually acoounts वैगेरे फार बोरिंग वाटतं मला" मी लगेच म्हटलं " तसं ते दिसतं फक्त ,पण मजा आहे त्यात पण....खरतर मलाही नाटक पाहायला फार आवडत, लहानपणी मी बालनाट्यात कामं पण केलीत "तिला एकदम कौतुक वाटला आणि आमचा गप्पा सुरु झाल्या.नाटक हा दोघींचाही जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मला जाणवला कि हा प्रवास विचारांनी सुखमय होणार हे नक्की. तमिळ असून पण सखाराम बाईंडर , अश्रूंची झाली फुले, ती फुलराणी अशी अनेक नाटकं तिने पहिली होती ,ती मराठी नाटकांबद्दल भरभरून बोलत होती....मग आमचे विषय मराठी संस्कृती,खाद्यापादार्थांवर गेले...इतपत कि अगदी तिने पुरणपोळी ची recipe तिचा tab मध्ये लिहून घेतली...बाहेर दिसणारा हिरवागार निसर्ग आमचा प्रवास अजूनच  सुंदर करत होता.खूप वर्षांनी एखादी मैत्रीण भेटावी असं वाटत होतं मला. मधेच पावसाची एखादी सर guest appearance देऊन जात होती.या सगळ्या गप्पांचा नादात मी विचारायलाच विसरले कि पोटापाण्यासाठी काय करते ही नेमकी?मी विचारल्यावर हसायला लागली आणि म्हणाली "आत्ता काय करते ते सांगू कि आधी काय करायचे ते कि पुढे काय करणार ते?"मला काही कळलंच नाही ..या तिन्ही काळात तिचं कामं कसं काय बदलू शकतं? माझा चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून ती स्वतःच म्हणाली "मी एक Travel show direct करतेय सध्या" मला ऐकून फारच interesting वाटलं, मी लगेचच तिला त्याबद्दल details विचारले.भारतातल्या अनेक जुन्या गावांचा इतिहास शोधून त्याचा अभ्यास करून भारत एका वेगळ्या स्वरुपात दाखवायचा अशी त्यांचा show ची concept होती. आणि त्या संदर्भातच एका गावाचा अभ्यास करायला सिंधुदुर्ग चा एका गावात ती जात होती.तिची research  team मागून कार ने येणार होती.पण हिला मात्र खास ट्रेनचाच प्रवास करायचा होता.मग राहवलं नाही म्हणून मग मी विचारलंच कि या आधी नेमकं काय कामं करायचीस? आणि पुढे काय करणारेस? तर म्हणाली "आधी एका director ला assist  करायचे documentries साठी...research वैगेरे..त्या आधी एका magazine साठी creative head म्हणून कामं केलं" मला ऐकताना इतका भन्नाट वाटत होतं.कितीतरी दिवसांनी काहीतरी नवीन मी ऐकत होते.रोज काहीतरी नवीन, किती मस्तय हे field असं वाटत होतं.रोज नवीन माणसांना भेटायचा,नवीन गोष्टींचा शोध,फिरत राहायचं..मस्तच!मी तिची करियर गाथा ऐकून हुरळून गेलेय हे तिचा लक्षात आल्यावर तिने तिची दर्दभरी कहाणी सुरु केली कि कसं या सगळ्यात struggle आहे,fix पैसे नाही, आज कामं आहे तर उद्या नाही.त्यात कधी कधी depression पण येतं ...पण स्वतःलाच धीर देऊन नवीन कामं शोधावं लागतं,पण आपण एखादं चांगलं कामं केलं असेल तर लोक त्या reference ने अगदी दोन वर्षाने कामं घेऊन पण येतात.मला राहवलं नाही आणि मी तिला विचारलंच " बाप रे इतका experience ? नेमकी कधीपासून कामे करतेयस तू?Don't  you want to settle down ? Don't you need a stability?" तर ती हसायला लागली आणि म्हणाली " मी माझा दोन पायांवर उभी आहे तितकी stability पुरेशी  आहे.मी गेली ९ वर्ष कामं करतेय . I am 32 now"मला धक्काच बसला ऐकून .तिला मी नोटीस केलं तेव्हापासून ती मला माझा वयाची वाटलेली.३२ तर मुळीच दिसत नाही,सोल्लिड maintain केलंय नाहीतर आमचा ऑफिस मधल्या तिशीचा मुली चाळीशी ओलांडलेल्या काकू दिसतात. लगेचच आईबाबान type प्रश्न विचारला "अजून लग्न नाही का झालं?" तर म्हणाली"लग्न केलं नाही, एक आवडलेला.3 वर्ष relationship मध्ये होतो पण पुढे जमलं नाही..आणि मग पुढे इतर कुणी आवडलाच नाही..बघू पुढे काय होतंय ते.. "मी मनात म्हटलं या beauty विथ brain ला कसं कुणी नाकारू शकतं.तिनेही लगेच माझाबद्दल विचारला, मी लगेच निखिल बद्दल सांगितल."माझा स्वतःचा ऑफिस सुरु करायचंय म्हणून थांबलोय थोडं लग्नासाठी.,,मला लग्न आधी थोडी stability  हवीय " तर ती हसायला लागली आणि म्हणाली "२५व्य वर्षी stable व्हायचंय? त्या stability मध्ये खुश राहता आलं तर अजून काय हवं म्हणा .."मला खरतर कळलंच नाही ती असं का म्हणाली ते.विषय बदलावा म्हणून मुद्दाम विचारला तिला "पुढचे काय प्लान्स?" तर ती म्हणाली "एक नाटक लिहिलंय,ते direct करायचा आहे..बघू हा travel  show  झाला कि ठरवेन " मी तिला म्हटल कि भीती नाही वाटत का अशा अधांतरी गोष्टींची तर ती म्हणाली " भीती कसली त्यात?आजचा दिवस जगतोय हेच किती महत्वाचा आहे , मग आजचा  दिवस पूर्णतः जगून घ्यायचा, पुढे जे व्हायचं ते होणारच.पुढचा विचार करून प्रश्नांची उत्तर तर मिळणार नाहीत...वेळ हेच सगळ्याच उत्तर आहे ..तुही तुझा  ऑफिसची, लग्नाची चिंता करणं सोड.ते जेव्हा व्हायचं तेव्हा होईलच...स्वतःवर आणि स्वतःचा कामावर विश्वास ठेव" मला एकदम हुरूप आला ते सगळं ऐकून..कधीतरी आपल्याला न ओळखणारी  माणसपण किती पटकन ओळखून जातात कि नेमकं आपल्याला काय हवंय ते...खरतर या ब्रेक पेक्षा मला काय हवं होतं ते हिने ओळखला होतं बहुदा..कदाचित हेच मला कळायला हा प्रवास घडत असेल आणि ही अनुष्का मला भेटली असेल..
आमचा गप्पांचा नादात जेवणाची वेळ झाली होती आम्ही दोघींनीही पुलाव order केलेला आणि मग नंतर तो खाता खाता मी तिला म्हटलं "आज खूप दिवसांनी इतका काही ऐकतेय, बोलतेय मी...नाहीतर नेहमीचा ठरलेल रुटीन आणि रविवारचा निखिल बरोबर फिरणं आणि माझ्या आणि निखिलचा गप्पा त्या काय तर लग्नात असं करू नि  तसं....असं कुणी इतका बोलायला भेटलाच नाही कधी...Thank you  अनुष्का" तर ती म्हणाली " नो need to thanks , मला पण छान कंपनी मिळाली कि तुझी..चांगलं वेळ गेला.." असाच बोलत बोलत आमचा पुलाव संपवला आणि तिने सीट खालून तिची sack  काढायला सुरवात  केली  मी म्हटला " अजून वेळ आहे" तर ती म्हणाली"No,its just half and hour far"मला कळलंच नाही काय react करावं, कारण मला अजून बोलायचा होतं तिचाशी..पण थांब कसं म्हणणार..तिचं Destination जे आहे तिथे ती जाणारच..bag पाठीला लाऊन माझाकडे हात पुढे करून म्हणाली " Nice to see you Ashwini. छान  वाटल भेटून , बोलून ..hope to see you in some other  train, other route...or somewhere in Bombay." मीही लगेच म्हटल " yes , Bombay मध्ये भेटूच" ती बाय करून पुढे गेली..तिचं स्टेशन आलं होतं.गाडी थांबली..ती उतरली..माझा खिडकीकडे आली आणि म्हणाली "Stability means resistant to change , but change is constant....so Don't run to become a stable..run for happiness... " आणि आत्ता मला तिचं सगळं बोलणं खऱ्या अर्थाने कळलं होतं.

Wednesday, July 2, 2014

एका संधीचा शोधात...

एका विचित्र वळणावर आलेय मी , थांबताही येत नाही आणि वळून पाहताही येत नाही .सतत चालत रहावं लागतंय दिशाहीन, पाय फुटेल त्या रस्त्याला...एका संधीचा शोधात. खरतर किती अधांतरी आहे हे दिशाहीन चालणं....म्हणजे कदाचित सुख , आनंदाने भरलेला गुलदस्ता माझी वाट पाहतोय असं असेलही किंवा त्रास, दुख्ख यांच काट्यांनी गुंफलेला जाळ...कोणी पाहिलंय पुढे काय मांडून ठेवलंय.. आपण मात्र चालत राहायचं एका संधीचा शोधात..दिवसा बरं असतं, निदान प्रकाशात काही आशा , हुरूप तरी जन्माला येतात.रात्रीचा काळाकुट्ट अंधारात मात्र काहीच दिसत नाही ..जिथे फक्त डोळे गच्च बंद करून स्वप्न पहायची थोडीफार अपेक्षा करता येते...पण एका संधीचा शोधात माणसं मात्र अनेक भेटतात.नशिबाने चांगली माणसं मिळाली तर ते योग्य मार्ग तरी दाखवतात नाहीतर तसंही बाकीचे स्वतःच रस्ता चुकलेले असतात.आपला मात्र प्रामाणिक प्रयत्न चालू असतो ती एक संधी मिळवण्यासाठी पण लोकांची दुनियादारी पाहून मन आपलंही विचलित होतंच.पण त्या विचलित मनाला रोखायचा कि धावू द्यायचा ते मात्र आपल्यावर असतं.त्या एका संधीचा शोधात आपण मैलोंमैल चालतो तहानभूक विसरून ...एकटेच..खरतर विचार , माणूस, सावली असं हे त्रिकुट मात्र कायम एकत्र असतं .दिवसा रात्रीचा प्रकाशाप्रमाणे सावलीचा आकार बदलत असतो, प्रत्येक वाटेवर मिळणाऱ्या अनुभवांवरून विचार बदलतात आणि माणसाचा काय आहे...तोही बदलतोच की..चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो तसं झालंय माझं, स्वतःला सिद्ध करायला एक संधी मिळावी म्हणून त्या चातकाप्रमाणे संधीची वाट पाहतेय मी. सावलीचं एक बरं असतं ती असते सतत बरोबर .पण मला एक कळत नाही की माझा या अशा निरर्थक शोधात का ती साथ देत असते माझी?काय मिळणारय  शेवटला?माझा बरोबर सावलीही विरूनच तर जाणाराय...पण मग जाणवला की हि सावली खरतर आपलाच दुसरं रूप असतं. आपल्या विचारांना मजबूत करण्यासाठी जसं आपल्याला दुसऱ्यांचा पाठिंब्याची गरज असते त्याप्रमाणे हि सावली आपल्याला पाठीबाच तर देत असते निमुटपणे , कसलंही आमिष दाखवता...ती मात्र  असते सतत सांगायला '"मी आहे तुझाबरोबर  चालत रहा'"...आणि विचारांचं म्हणाल तर ते काही आपली पाठ सोडत नाहीत.चांगले वाईट अशा सगळ्यांच विचारांमध्ये आपण आपल्याला कळण्याआधीच गुरफटून गेलेलो असतो...असंच चालता चालता एक दिवस ती संधी  मिळेलही कदाचित  पण नाहीच मिळाली तर निदान स्वतःला तरी या प्रवासात शोधता आलं हा आनंद नक्की मिळो इतकीच काय ती माफक अपेक्षा  ठेवते...आणि चालत राहते त्या एका संधीचा शोधात...